आपल्या हिंदूंची आन, बाण आणि शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक शौर्यगाथा जगभर प्रसिद्ध आहे. महाराजांनी कायम शत्रूच्या विरोधात उभे राहून आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. महाराजांनी बऱ्याचवेळा आपल्या शक्तीचा नाही तर युक्तीचा देखील वापर केला. ज्यामुळे त्यांना त्यांचा विजय अधिक लवकर मिळवता आला. आजही महाराजांनी केलेले गनिमीकावे चर्चेचा विषय ठरतात. महाराजांवर कधीही सध्या, दुबळ्या शत्रूंनी हल्ला केला नाही. त्यांनी कायम सशस्त्र आणि ताकदवान शत्रूशी लढा दिला. महाराजांच्या विजयाच्या गाथांमधील एक अतिशय प्रसिद्ध विजय म्हणजे ‘अफझलखानाचा वध’. (SHivaji Maharaj)
प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी आपल्या वाघनखांनी अफझलखानाचे पोट फाडत त्याचा वध केला होता. हा विजय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. पण अफझलखानाबद्दल जास्त कोणाला माहित नसेल आणि त्याच्या ६३ बायकांबद्दल तर खूपच मोजक्या लोकांना माहिती आहे. आज आम्ही याच क्रूर अफझलखानाचा एक निष्ठुर आणि राक्षसी रूपाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. (Marathi)
१६६८ पर्यंत विजापूर हे शहर आदिलशाहीची राजधानी होते. अफझल खान हा आदिलशहाच्या प्रमुख सरदारांपैकी एक बलशाली सरदार होता. विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती असलेल्या अफजल खानाने आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १६५९ मध्ये विजापूरचा सुलतान अली आदिल शाह दुसरा याने अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास पाठवले होते. अफझलखान इतका क्रूर होता की, जेव्हा त्याला महाराजांना मारण्यासाठी मोहिमेवर जाण्यास सांगितले गेले. तेव्हा त्याने जाण्याआधी चक्क आपल्या ६३ पत्नींची हत्या केली होती. (Todays Marathi News)

बडी बेगमने जेव्हा अफझलखानाला स्वराज्यामध्ये जाऊन महाराजांना मारण्याची मोहीम बलाढ्य अशा अफझलखानाकडे सोपवली तेव्हा तो खूपच खुश झाला. त्याला स्वतःवर खूपच गर्व होता. तो महाराजांना नक्कीच मारणार असा विश्वास देखील त्याला होता. अफझल खानाने मोहिमेवर निघण्याआधी आपले भविष्य जाणून घेतले. त्याचा भविष्यावर आणि ज्योषिशास्त्रावर खूपच विश्वास होता. तेव्हा त्याला समजले की, तो या मोहिमेतून जिवंत परत येणार नाही. (Trending Marathi Headline )
आपण जिवंत राहणार नाही असे समजल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला की, असे झाले तर आपल्या ६३ बायका इतर पुरुषांसोबत राहतील, किंवा त्यांना इतर पुरुष त्रास देतील म्हणूनच त्याने या ६३ बायकांना विजापूर येथील एका विहिरीजवळ नेले आणि सगळ्यांना विहिरीमध्ये ढकलून दिले. त्यानंतर कबरींमध्ये त्यांना पुरून टाकले. आजही कर्नाटकातील विजापूर येथे एक चबुतऱ्यावर कबरींच्या सात रांगा दिसतात. त्यात पहिल्या चार रांगांमध्ये ११, पाचव्या रांगेत पाच, सहाव्या आणि सातव्या रांगांमध्ये सात अशा एकूण ६३ कबरी आहेत. (Top Stories)
======
Iran-USA: इराणमध्ये झालेला अपमान आजही अमेरिकेला दुखावतोय….
======
या कबरींचा आकार, डिझाइन आणि अंतर एकसमान असल्याने त्या अशा व्यक्तींच्या असाव्या, ज्यांचा मृ्त्यू जवळपास एकाच वेळी झाला आहे, असे यांना पाहून लक्षात येते. या शहराच्या एका कोपऱ्यात साठ कब्र नावाचे एक स्थळ आहे. याच ठिकाणी त्याने आपल्या पत्नींना पुरले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ज्योतिषांच्या भविष्यवाणीचा अफझलखानावर एवढा पगडा होता की त्याने कबरीच्या शिलेवर विजापूरमधून निघण्याची तारीख त्याच्या मृत्यूची तारीख म्हणून लिहिली. आपण परत येणार नाही, हा विचार अफझल खान आणि त्याच्या सैन्याच्या मनात असल्याने त्याने ही तारीख लिहिली असावी. (Social NEws)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics