Home गाजावाजा स्पेशल Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा
गाजावाजा स्पेशल

Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा

1
Ekadshi

प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. काही दिवसांपूर्वीच कार्तिकी अर्थात देव उठनी एकादशी झाली. आता मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हणतात. सामान्यपणे ही एकादशी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये येते. उत्पत्ति एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते. चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी असल्याने या एकादशीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात. (Ekadshi)

यावर्षी उत्पत्ति एकादशी ही मार्गशीर्ष कृष्ण एकादशी तिथी शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.४९ वाजता सुरु होत आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३७ वाजता होणार आहे. यावरून शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी उत्पत्ति एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. उत्पत्ति एकादशीचे व्रत करण्यासाठी सकाळी ०८.०४ ते ०९.२५ या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते. या दिवशी पूजेसाठी हा चांगला काळ मानला जातो. उत्पत्ति एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे ४.५८ ते ५.५१ पर्यंत असेल. यावेळी अभिजित मुहूर्त सकाळी ११.४४ ते दुपारी १२.२७ पर्यंत असेल. याशिवाय यावर्षी उत्पत्ति एकादशीला उत्तराफाल्गुनी नक्षत्र पहाटेपासून रात्री ११:३४ पर्यंत चालणार आहे त्यानंतर हस्त नक्षत्र असेल. एकादशीचा विष्कंभ योग पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत राहील. (Utpanna Ekadashi)

उत्पत्ति एकादशीचे व्रत हे भगवान विष्णुंना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णुची विशेष उपासना केली जाते. विधी पूर्वत या व्रताला केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असा समज आहे. या व्रताचा विधी मनोभावे केल्याने दांपत्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक उर्जा देखील निघून जाते. त्यामुळे घरात समृध्दी नांदते, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार, भय यापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. (Marathi News)

उत्पत्ति एकादशी पूजा विधी
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील मंदिराची स्वच्छता करावी. यानंतर दिवा लावून भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक करावा. भगवान विष्णूला सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई आणि चंदन अर्पण करा. त्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी. भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करावी. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने विशेष फल प्राप्त होते. भगवान विष्णूच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश करा. (Todays Marathi Headline)

Ekadshi

उत्पन्ना एकादशी कथा
सत्ययुगात मुर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. तो खूप भयानक होता. त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले. तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले, आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली. मुर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्युलोकात भटकत आहेत. तेव्हा भगवान शिव म्हणाले. तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दु:खाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा. तेच तुमचे दु:ख दूर करू शकतात. (Latest Marathi Headline)

भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले. श्रीविष्णू निद्राअवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले. देवांचे रक्षणकर्ते मधुसूदन तुम्हाला नमस्कार, आमचे रक्षण करा. असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे. राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे. आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत, आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा. इंद्र देवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, हे इंद्र! तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे, त्याचे नाव काय आहे, त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे? हे सर्व सांग. (Top Marathi News)

भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला-भगवान प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याला मुर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता. त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे. त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैरीत इत्यादींचे स्थान घेतले आहे. हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करीन. तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा. असे म्हणत प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले. त्यावेळी मुर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता. त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले. (Top Stories)

========

Kalabhairav : कोण आहेत कालभैरव !

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

========

जेव्हा श्रीविष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले. श्रीविष्णूने बाणांनी वार केले. अनेक राक्षस मारले गेले परंतु मुर राक्षस जिवंत राहिला. त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते पण तो लढत राहिला. त्यांचे युद्ध १० हजार वर्षे चालू राहिले परंतु मुरचा पराभव झाला नाही. थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले. हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती, भगवान विसाव्यासाठी आत गेले. ही गुहा १२ योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता. भगवान विष्णू योगनिद्राच्या अधीन झाले. (Top Trending News)

मुर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला. तेव्हा भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी, तेजस्वी देवी प्रकट झाली. देवीने मुर राक्षसाला आव्हान दिले, त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला. जेव्हा श्री हरी योगनिद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून तुझी उत्पन्ना एकादशी या नावाने पूजा केली जाईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!