नुकतीच हिंदू नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या एकादशीला मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मात एकादाशी तिथीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात. त्यानुसार, वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. प्रत्येक एकादशी वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि तिचे महत्त्वही वेगळे असते. त्यानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी कामदा एकादशी नावाने ओळखली जाते. ही एकादशी विष्णूला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथीला विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी व्रत ठेवण्याचेही खूप महत्त्व आहे. (Kamada Ekadshi)
हिंदू नववर्षातील ही पहिली एकादशी आहे. कामदा एकादशी चा अर्थ आहे, ‘सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी’. त्यामुळे मनोकामनापूर्तीसाठी अनेकजण या एकादशीचा उपवास करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने संसारात सुख, समृद्धी येते तसेच आर्थिक अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. धर्म ग्रंथानुसार कामदा एकादशी व्रत पुण्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. ही एकादशी कष्ट दूर करणारी आणि मनासारखे फळ प्राप्त करून देणारी असल्यामुळे शास्त्रामध्ये ही कामदा एकादशी नावाने ओळखली जाते. (Marathi)
यावर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात २८ मार्च रोजी सकाळी 8.45 वाजता होत आहे आणि या तिथीची समाप्ती २९ मार्च रोजी सकाळी ७:४६ वाजता होणार आहे. उदयतिथीनुसार कामदा एकादशीचे व्रत 29 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी कामदा एकादशीचे व्रत करण्याचे पांडवांना सांगितले होते असे पौराणिक कथांमध्ये समजते. पांडवांच्या सोबत युद्धभूमीवर श्रीकृष्ण होतेच मात्र तरी देखील आपले कर्म करण्यासाठी पांडवांना व्रत करावे लागले. हे व्रत इतके प्रभावी आहेत की भगवान विष्णूंची कृपा पांडवांवर झाली आणि त्यांना गमावलेले वैभव, राज्य सर्वकाही परत मिळाले. युद्धभूमीवर पांडवांचा विजय झाला. त्यामुळे हे व्रत इच्छापूर्तीसाठी केले जातात. (Todays Marathi Headline)

कामदा एकादशीचे मनोभावे व्रत केल्याने भक्तांची सर्व पापे आणि दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. पवित्र भावनेने आणि निर्मळ मनाने हे व्रत चांगल्या कामनेसाठी करावेत असे म्हंटले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा होऊन घरात सुखशांती येते. कौटुंबिक वातावरण प्रफुल्लित राहते. कुटुंबावर कृपा होते असे म्हणतात. कामदा एकादशीचे व्रत केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. कर्जमुक्तीसाठी देखील हे व्रत करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मी ही धनसंपदा देते. त्यामुळे आर्थिक अडचणी असतील तर देवीची कृपा होण्यासाठी एकादशीला हे व्रत करून ते द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडले जातात. (Top Marathi News)
कामदा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठा, सर्व काम सोडून द्या आणि स्नान करा. यानंतर, स्वच्छ कपडे घाला आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना उपवास करण्याचे व्रत घ्या. यानंतर, तांब्याच्या भांड्यात पाणी, फुले, तांदूळ आणि सिंदूर घाला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. नंतर व्यासपीठावर पिवळे कापड पसरवा आणि भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा. भगवान विष्णूच्या मूर्तीला ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. पंचामृत इत्यादींनी स्नान केल्यानंतर, कपडे, चंदन, पवित्र धागा, सुगंध, अक्षत, फुले, तीळ, धूप-दीप, नैवेद्य, ऋतूतील फळे, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करा. यानंतर, कामदा एकादशीची कथा ऐका किंवा वाचा आणि एकादशी व्रत पूजेनंतर आरती करा. कामदा एकादशीच्या दिवशी (Latest Marathi Headline)
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।।’
शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम्
विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्॥
ॐ वासुदेवाय विघ्माहे वैधयाराजाया धीमहि तन्नो धन्वन्तरी प्रचोदयात् ||
ॐ तत्पुरुषाय विद्महे अमृता कलसा हस्थाया धीमहि तन्नो धन्वन्तरी प्रचोदयात् ||
या मंत्रांचा जप केल्यास उत्तम फळ मिळते.
कामदा एकादशी कथा
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात भोगीपूर राज्य होते, ज्याचा राजा पुंडलीक होता. तो संपत्ती आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होता. त्याच्या राज्यात ललित आणि ललिता नावाचे स्त्री-पुरुष राहत होते. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. एकदा ललित राजा पुंडलिकाच्या दरबारात इतर कलाकारांसोबत गाणे म्हणत होता. गाणे गात असताना ललित याला ललिताला दिसली. तिला पाहून ललितचे लक्ष विचलित झाले आणि त्याचा सूर बिघडला. जेव्हा राजा पुंडलिकाला हे समजले तेव्हा त्याने ललितला मानव आणि कच्चे मांस खाणारा राक्षस बनण्याचा शाप दिला. या शापाच्या प्रभावामुळे ललित राक्षस बनला. त्याचे शरीर लांब झाले. तो जंगलात राहू लागला. हे सर्व पाहून त्याची पत्नी ललिता दुःखी झाली आणि ती ललितच्या शोधात फिरत राहिली. (Top Trending Headline)
=========
Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी
=========
एके दिवशी ललिता चालत चालत विंध्याचल पर्वतावरील शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली, तिथे तिने ऋषींना नमस्कार केला यावर शृंगी ऋषींनी ललिता हिला येथे येण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रृंगी ऋषींनी सांगितले की, तू कामदा एकादशीचे व्रत कर आणि त्याचे पुण्य तुझ्या पतीला दे, यामुळे तो लवकरच राक्षसी रूपापासून मुक्त होईल. शृंगी ऋषींकडून चैत्र शुक्ल एकादशी व्रताची माहिती जाणून घेत ललिताने विधिवत व्रत केले. त्यानंतर या व्रताचे पुण्य तिच्या पतीला मिळावे यासाठी तिने देविची प्रार्थना केली. त्यानुसार, या व्रताचे पूण्य ललिताच्या पतिला लाभले आणि ललित हा राक्षस रूपापासून मुक्त झाला. विष्णूंच्या कृपेने ललित राक्षस रुपातून मु्क्त झाला. आणि दोघे पति-पत्नी पूर्वीप्रमाणेच जीवन जगू लागते. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- chaitra shudha ekadshi 2026
- ekadshi
- Kamada Ekadshi
- Kamada Ekadshi 2026
- Kamada Ekadshi information
- Kamada Ekadshi katha
- Kamada Ekadshi puja
- Kamada Ekadshi significance
- Kamada Ekadshi story marathi
- lord vishnu and laxmi
- lord vishnu and laxmi puja
- lord vishnu puja
- कामदा एकादशी
- कामदा एकादशी 2026
- कामदा एकादशी कथा
- कामदा एकादशी कधी आहे
- कामदा एकादशी पूजा
- कामदा एकादशी महत्त्व
- कामदा एकादशी माहिती
- कामदा एकादशीचे महत्त्व
- चैत्र शुद्ध एकादशी
- विष्णू आणि लक्ष्मी पूजा
- विष्णू पूजा