महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे, संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील पैठण येथील वारकरी संप्रदायातील थोर संत, कवी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी मराठी साहित्यात एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि अनेक लोकप्रिय भारुडे लिहून भक्तीचा सोपा मार्ग सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले एकनाथ महाराज समतेचे व मानवतेचे कैवारी मानले जातात. फाल्गुन वैद्य षष्ठी या तिथीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्याने हा दिवस दरवर्षी नाथषष्ठी म्हणून साजरा केला जातो. (Eknathshasthi)
फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते. ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठीला वयाच्या ७२ व्या वर्षी सदेह जलसमाधी घेतली. त्यांनी ‘शांतीब्रह्म’ म्हणून ओळखले जाणारे आपले कार्य पूर्ण करून विठ्ठल नामाचा गजर करत गोदावरीत प्रवेश केला. यंदा हा दिवस ९ मार्च सोमवारी रोजी साजरा होत आहे. (Eknath Maharaj)
एकनाथ महाराजांचा जन्म एका देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. (Marathi)
वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा. (Todays Marathi Headline)

एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून ते नाथांच्या द्वारी उभे असत, असे सांगितले जाते. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त, देवीभक्तही होते. (Social Updates)
नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटले जाते, त्या ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे २५० वर्षानंतर नाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांची विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. (Top Trending Headline)
एकनाथ महाराजांच्या गुरुदेवांनी श्री जनार्दन स्वामींनी त्यांना श्रीकृष्णाच्या उपासनेची दीक्षा दिली आणि शुलभंजन पर्वतावर राहून तपश्चर्या करण्याचा आदेश दिला. कठोर तपश्चर्या करून ते गुरुआश्रमात परतले. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेने ते तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा संपवून श्री एकनाथजी आपल्या जन्मस्थानी पैठणला परतले आणि आजी-आजोबा आणि गुरूंच्या आज्ञेने विधिवत गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई होते. ती अतिशय एकनिष्ठ आणि आदर्श गृहिणी होती. (Top Marathi NEws)
संत एकनाथ महाराज हे एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी भगवद्गीता, रामायण आणि भागवत पुराण यांसारख्या ग्रंथांवर भाष्ये लिहिली. तसेच त्यांनी अभंग, भारूड आणि गवळण यांसारखी भक्तिगीते देखील रचली. एकनाथ महाराजांनी समाजात प्रचलित असलेल्या कुप्रथा आणि अंधश्रद्धांना विरोध केला. त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र राहण्याचा आणि एकमेकांवर प्रेम करण्याचा उपदेशही केला. त्यांच्या कामांमध्ये श्रीमद्भागवताच्या अकराव्या अध्यायावरील मराठी भाष्य, चतुष्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, संत चरित्र आणि आनंद लहरी यांचा समावेश आहे. (Marathi News)
एके दिवशी एकनाथजी समाधीत असताना एक भयंकर काळा साप त्याच्या अंगाभोवती गुंडाळला. एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला. तो साप एकनाथजींचा साथीदार झाला. तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला. समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर फना पसरून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा. (Latest Marathi Headline)
पण एकनाथजींना याची माहिती नव्हती. एके दिवशी एकनाथजींसाठी दूध घेऊन आलेल्या शेतकरी एकनाथजींभोवती साप गुंडाळेला पाहून ओरडला. तेव्हाच एकनाथजींची समाधी तुटली आणि मग ते उठले आणि सापही दूर जाताना दिसला. अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरूंना सांगितले. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली. आता माझा एक निद्रावंद पूर्णपणे नारायणात स्थापित झाला आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. यानंतर एकनाथजींची ‘एकनाथजी महाराज’ म्हणून पूजा करण्यात आली. ‘एकनाथी भागवत’ सारख्या ग्रंथातून त्यांनी समाजात दिव्य रसाचा प्रवाह वाहिला. (Top Stories)
=========
Sheetala Ashtami : शीतला अष्टमीच्या दिवशी का खाल्ले जाते शिळे अन्न?
=========
संत एकनाथ महाराजांना ज्या दिवशी जलसमाधी घेतली तो दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी वारकरी संप्रदायात या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव साजरा केला जातो. यावेळी यात्रोत्सवाला लाखोंचा संख्येने वारकरी येत नाथांच्या समाधीच्या दर्शन घेतात. या उत्सवानिमित्त दरवर्षी तीनशेपेक्षा जास्त दिड्या पैठणमध्ये दाखल होतात. या तिथीला संत एकनाथांच्या पादूकांना स्नान घातले जात उत्सवाचा जल्लोष केला जातो. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- eknath maharj
- Eknathshashti
- Eknathshashti 2026
- Eknathshashti importance
- Eknathshashti information
- Eknathshashti mahiti
- Eknathshashti significance
- lord vitthal
- saint eknath
- sant eknath
- what is Eknathshashti
- एकनाथ महाराज
- एकनाथ षष्ठी
- एकनाथ षष्ठी २०२६
- एकनाथ षष्ठीची माहिती
- एकनाथ षष्ठीचे महत्त्व
- संत एकनाथ
- संत एकनाथ महाराज