आजच्या आधुनिक काळात शहरं, गावं, झपाट्याने बदलत असून, त्याचाच चांगला कायापालट होत आहे. सगळ्याच बाबतीत आता आधुनिकरण होत असून, अनेक मोठ्या शहरांमध्ये डोळे दिपवणारा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. कालानुरूप प्रत्येक गोष्टींमध्ये होणारे बदल आपण बघत आलो आहोत. आधुनिकरणाची ओळख म्हणजे त्या विशिष्ट शहरामध्ये, गावामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग. कोणत्याही नवीन ठिकाणी आपण गेलो की, उंचच्या उंच बिल्डिंग आपले लक्ष वेधून घेतात. सर्वच मोठ्या बिल्डिंग आपण नीट पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की, या बिल्डिंगला बाहेरून भिंती नसतात तर काचा लावलेल्या असतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, या इमारतींना काचा का लावल्या जातात? (GK)
अनेकांना असे वाटते की, इमारतींना सुंदर बनवण्यासाठी असे केले जाते किंवा ही स्टाइल असेल मात्र यामागचे खरे कारण हे नाहीये. उंच इमारती काचेपासून बनवण्याचे कारण फक्त सौंदर्य असे वाटते. पण, प्रत्यक्षात तसे नाही. उंच इमारतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काचेचा वापर करण्यामागे अनेक मोठी आणि वेगळी कारणे आहेत. नैसर्गिक प्रकाश आणि विजेची मोठी बचतकाचेच्या इमारती बनवण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ‘डे-लाईट हार्वेस्टिंग’. काचेच्या भिंतींमुळे सूर्यप्रकाश थेट इमारतीच्या आतपर्यंत पोहोचतो. यामुळे दिवसाच्या वेळी कार्यालयांमध्ये कृत्रिम दिवे लावण्याची गरज भासत नाही. परिणामी, विजेच्या वापरात मोठी घट होते आणि पर्यावरणाचं रक्षणही होते. (Marathi)

काचेच्या या इमारती अशाप्रकारे बनवल्या जातात की त्या, जोरदार वारा, भूकंप किंवा इतर दाबांनाही सहज तोंड देऊ शकतात. या इमारती कोणत्याही हवामानाचा सामना करु शकतात आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची काळजीही यात नसते. या इमारतींमध्ये सामान्य काच नाही तर एक विशेष प्रकारच्या इन्सुलेटेड काचांचा वापर केलेला असतो. ही काच बाहेरून येणारी उष्णता किंवा थंडी आत येऊ देत नाही, ज्यामुळे एअर कंडिशनर (एसी) किंवा हीटर वापरण्याची गरज कमी होते. यामुळे ऊर्जेची बचत होते. काचेच्या इमारती सुंदर, आधुनिक आणि व्यावसायिक दिसतात. कॉर्पोरेट कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या ब्रँडची उपस्थिती आणि प्रभाव वाढवणाऱ्या ऑफिस स्पेस पसंत करतात. (Top Stories)
आधुनिक काचेच्या टेक्नोलॉजीमुळे काचेपासून बनलेल्या इमारती भूकंप, वादळाला तोंड देण्यासाठी सक्षम असतात. ओलावा आणि हवामानामुळे यांचे कोणतेही नुकसान होत नाही. इमारत काचेची असल्याने आगीपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते. जरी काही कारणास्तव आग लागली तरी काचेच्या रचनेमुळे धूर आणि उष्णता लवकर बाहेर पडते. ज्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळतो. काचेच्या भिंती कमी धूळ आणि घाण जमा करतात. याशिवाय, त्यांना साफ करणं वीट किंवा दगडी भिंतींपेक्षा सोपं जाते. त्यामुळे उंच इमारती काचेच्या असतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics