Home लाईफ स्टाईल अविश्वसनीय, गूढ रहस्य असलेले कोणार्क मंदिर
लाईफ स्टाईल

अविश्वसनीय, गूढ रहस्य असलेले कोणार्क मंदिर

6
Konark Sun Temple

आपल्या भारत देशाला अतिशय मोठा आणि जाज्वल्य इतिहास लाभला आहे. भारतामध्ये असंख्य ऐतिहासिक जागा असून, या जागांबद्दल मोठा आणि जुना इतिहास तर आहेसच. मात्र सोबतच या जागांबद्दल अनाकलनीय, गूढ आणि आजवर सोडवता न आलेली अनेक रहस्य आहेत. आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हणून देखील ओळखले जाते. भारतामध्ये अनेक अशी मंदिरं आहेत, ज्यांना शेकडो, वर्षांचा इतिहास आहे. याच मंदिरांमध्ये दडली आहेत अनेक गूढ रहस्य. तिरुपती बालाजी मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर, पद्मनाभ मंदिर ही अशी रहस्यमयी मंदिरांची काही उदाहरणं आहेत. यातलेच एक रहस्यमयी मंदिर म्हणजे ओडिशामधील कोणार्क मंदिर.

भगवान सूर्याचे हे पौराणिक आणि रहस्यमय मंदिर चंद्रभागा नदीच्या काठावर कोणार्क नावाच्या ठिकाणी आहे. कोणार्क सूर्य मंदिर भारतातील ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरीपासून ३५ किमी उत्तर-पूर्व कोणार्क शहरात आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधले गेलेले एक हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव यांनी केल्याचे सांगितले जाते. हे भारतातील निवडक सूर्यमंदिरांपैकी एक आहे. १९८४ मध्ये, युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. येथील दगडांवर केलेले उत्कृष्ट कोरीव कामच या मंदिराची भावना सांगतात.

कोणार्क मंदिर आणि त्याचे विशिष्ट पद्धतीचे डोळे दिपवणारी बांधकाम पाहिले तर यांनीच आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या काळी जेव्हा अनेक साधनांचा अभाव होता, तेव्हा असे बांधकाम म्हणजे नक्कीच मोठी बाब आहे. हे मंदिर बघताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, अनेक रहस्य या मंदिराने स्वतःजवळ बाळगले आहेत.

कोणार्क हा शब्द कोन आणि अर्का या दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये अर्क म्हणजे सूर्य देव असा आहे. या मंदिरात भगवान सूर्य रथावर आरूढ आहेत. हे मंदिर जगन्नाथ पुरीपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. हे सूर्यमंदिर पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येतात. ओडिशा येथे असलेले कोणार्क सूर्य मंदिर तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार ७२२ वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. हे मंदिर सँडस्टोन आणि ग्रॅनाइटपासून बनवलेले आहे. पुरी येथे, १२५० मध्ये गँग वंशाचा राजा असलेल्या नरसिंहदेव प्रथम याने हे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर कलिंग शैलीत बांधलेले असून, सूर्याची पहिली किरणं मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडावी, अशा पद्धतीने मंदिर पूर्व दिशेला बांधले गेले आहे.

या कोणार्क मंदिराची रचना रथाच्या आकाराची आहे. रथात चाकांच्या एकूण १२ जोड्या असून, एका चाकाचा व्यास सुमारे ३ मीटर आहे. या चाकांना धूप धाडी असेही म्हणतात कारण ते वेळ सांगण्याचे काम करतात. या रथात सात घोडे असून ते आठवड्यातील सात दिवसांचे प्रतीक मानले जाते.

कोणार्क सूर्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन शिल्पे आहेत, ज्यामध्ये सिंहाच्या खाली हत्ती आणि हत्तीखाली मानवी शरीर आहे. असे मानले जाते की चंद्रभागा नदी या मंदिराच्या उत्तरेला सुमारे २ किमी वाहत होती, जी आता नामशेष झाली आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी १२०० कुशल कारागिरांनी १२ वर्षे काम केले, परंतु मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर मुख्य कारागीर दिसुमुहरानाचा मुलगा धर्मपद याने बांधकाम पूर्ण केले.

कोणार्क मंदिर हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या मंदिरात सूर्य देव रथाच्या रूपात विराजमान आहेत आणि दगडांवर उत्कृष्ट नक्षीकाम केलेले आहे. संपूर्ण मंदिराची जागा सात घोड्यांनी ओढलेल्या चक्रांच्या बारा जोड्यांसह बांधलेली आहे, ज्यामध्ये सूर्य देव बसलेले दाखवले आहे. मात्र सध्या सातपैकी एकच घोडा शिल्लक आहे. मंदिराच्या पायथ्याशी बारा चक्रे वर्षाचे बारा महिने दाखवतात. तर प्रत्येक चक्र आठ औरसांनी बनलेले आहे, जे दिवसाच्या आठ घड्याळांचे प्रतिनिधित्व करतात. येथे स्थानिक लोक सूर्य देवाला बिरांची-नारायण म्हणतात. कोणार्क सूर्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पायथ्याशी १२ चाकांच्या जोड्या आहेत. ही चाके अद्वितीय आहेत कारण ती वेळ सांगतात. या चाकांच्या सावल्या पाहून दिवसाच्या अचूक वेळेचा अंदाज लावता येतो.

Konark Sun Temple

हे मंदिर पूर्वेच्या दिशेने अशा प्रकारे बांधले गेले आहे की सूर्याच्या पहिल्या किरण थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडेल. या मंदिराची उंची २२९ फूट म्हणजेच ७० मीटर आहे. या मंदिरात सूर्यदेवाच्या तीन मूर्ती तयार केल्या आहेत, ज्या एका दगडाने बांधल्या आहेत.

कोणार्क सूर्य मंदिराची पौराणिक कथा
पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा सांबा यांना कुष्ठरोगाचा शाप मिळाला. मग ऋषी कटक यांनी कुष्ठरोगाच्या प्रतिबंधासाठी भगवान कृष्णपुत्र सांबाला मित्रवन मधील चंद्रभागा नदीच्या काठावर भगवान सूर्यची उपासना करण्यास सांगितले होते, त्यानंतर सांबा यांनी चंद्रभागा नदीच्या काठावर सुमारे १२ वर्षे सतत सूर्य देवाची उपासना केली होती. भगवान सूर्य सांबाच्या कठोर तपस्चर्या मुळे प्रसन्न झाले आणि त्‍यांना कुष्ठरोगापासून मुक्ती दिली. असे म्हणतात की, सांबाने चंद्रभागा नदीच्या गर्भाशयात कोनार्कचे सूर्य मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे भगवान सूर्यदेवाला समर्पित केले गेले आहे.

कोणार्क सूर्य मंदिरामधील चुंबकीय दगड
काही पौराणिक कथांनुसार कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या शिखरावर एक चुंबकीय दगड ठेवण्यात आला होता. असे म्हटले जाते की, चुंबकीय दगडाचा असा प्रभाव आहे की समुद्राकडे जाणारे प्रत्येक पाण्याचे जहाज आपोआप या मंदिराच्या दिशेने ओढले जायचे. यामुळे, प्रत्येक पाण्याचे जहाज मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आणि बर्‍याचदा मार्गावरुन भटकून जायचे. पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की सर्व समुद्री जहाज आपले जहाज घेऊन मंदिराच्या वाटेवरून जात असत, त्यांचे चुंबकीय दिशा निर्देशक यंत्र दिशा योग्यप्रकारे सांगू शकत नव्‍हते. म्हणूनच असे म्हटले जाते की काही मुस्लिम नाविकांनी हा दगड मंदिरावरुन काढला आणि आपल्‍या सोबत घेऊन गेले.

परंतु इतर पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की हा दगड मंदिराच्या शिखरावर ठेवण्यात आला होता, कारण त्याने चार भिंती व्यवस्थितपणे केंद्रित केल्या आणि त्यांचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत केली. चुंबकीय दगड काढून टाकल्यामुळे असे म्हणतात की, मंदिराचा समतोल बिघडला आणि ते हळूहळू ढासळत गेले. इतिहासावर विश्वास ठेवला तर चुंबकीय दगडाचे अस्तित्व कधीच नव्हते आणि अशा घटनांचा उल्लेखही इतिहासात आढळत नाही.

कोणार्क सूर्य मंदिर आणि कालापहाडचे आक्रमण
कोणार्क मंदिराच्या पडझडीशी संबंधित एक अतिशय महत्वाचा सिद्धांत कलापहाडशी संबंधित आहे. ओरिसाच्या इतिहासाप्रमाणे १५०८ मध्ये कालपहाडने येथे आक्रमण केले आणि कोनार्क मंदिरासह ओरिसाच्या अनेक हिंदू मंदिरांचा नाश केला. पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे मदन पांजी सांगतात की, कालपहाडने ओरिसावर कसा हल्ला केला. त्यांनी कोणार्क मंदिरासह बहुतेक हिंदू मंदिरातील मुर्तीही तोडल्‍या. कोनार्क मंदिराच्या २०-२५ फूट जाड भिंती तोडणे अशक्य असले तरी, त्याने दाधीनौती (कमानी दगड) ला कसेबसे हलवले, ज्यामुळे मंदिर कोसळले. दाधीनौती हटवल्यामुळे मंदिर हळू हळू पडू लागले आणि छतावरून मोठे दगड पडल्याने मूकशाळाची छप्परही पाडण्यात आले. त्यांनी येथील बहुतेक शिल्पे तसेच कोनार्कमधील बरीच मंदिरेही पाडली.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!