Home गाजावाजा स्पेशल मुघलांना पराभूत करणाऱ्या महाराजानां शासक मानण्यास लोकांनी का दिला होता नकार, घ्या जाणून
गाजावाजा स्पेशल

मुघलांना पराभूत करणाऱ्या महाराजानां शासक मानण्यास लोकांनी का दिला होता नकार, घ्या जाणून

8
Shivrajyabhishek Din 2022

भारताच्या इतिहासातील योद्ध्यांची चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे. मुघलांना हरभरा चघळण्यात आणि भारताचा इतिहास गौरवशाली बनवण्यात शिवाजी महाराजांचे योगदान अविस्मरणीय आहे. यामुळेच 6 जून हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद मानला जातो. (Shivrajyabhishek Din 2022)

या दिवशी मुघलांचा पराभव करून शिवाजी महाराज परतले आणि स्वराज्याचा सम्राट म्हणून त्याचां राज्याभिषेक झाला. दरवर्षी 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. मराठा इतिहासात हा दिवस इतका महत्त्वाचा का मानला जातो हे या लेखात जाणून घेणार आहोत.

मुघल राज्यकर्ते हिंदूंवर अत्याचार करत असत

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. शिवाजी महाराजांचा जन्म इतिहासाच्या एका कालखंडात झाला जेव्हा दक्षिणेतील विजापूर (कर्नाटक) आदिल शाह आणि उत्तरेला आग्रा/दिल्ली येथे मुघल सम्राटांचे राज्य होते. ज्या राजवटीत हिंदूंवर अत्यंत अत्याचार झाले.

आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, मुघल शासकांनी इराणी (पर्शियन) आणि मध्य आशियाई लोकांना न्यायालये आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्राधान्य देण्यास सुरुवात केली, त्यामुळे स्थानिक भारतीय जहागीर बाजूला ठेवण्यात आल्या. लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते पण त्याविरोधात आवाज उठवणारे कोणीच नव्हते.

जेव्हा मुघलांविरुद्ध उठवला गेला आवाज

याच दरम्यान पुण्याच्या आसपासच्या मावळ भागातील शिवाजी शाहजीराव भोंसले यांच्या नेतृत्वाखालील मराठ्याचां एक गट आदिलशाह आणि मुघलांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी उभा राहिला. शाहजीराव भोंसले यांच्या नेतृत्वाखालील सेनानींनी आपली सत्ता बळकट केली आणि लवकरच ते एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आले. त्यांच्याबद्दल एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांचा लढा इस्लामविरुद्ध नव्हता तर योगायोगाने मुस्लिम असलेल्या निरंकुश राज्यकर्त्यांविरुद्ध होता. 1659 मध्ये, शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर आदिल शाहच्या सैन्याशी लढाई केली ज्यात त्यांचा विजय झाला.

Photo Credit – Twitter

पुरंदरचा तह

प्रतापगडच्या विजयानंतर शिवाजी महाराजाची उंची वाढली पण त्यांना मुघलांशी पुरंदरचा तह करावा लागला. या तहानुसार त्याने जिंकलेली अनेक क्षेत्रे मुघलांना परत करावी लागली. यानंतर 1666 मध्ये महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले तेव्हा मुघल शासकाने त्यांना त्याचा मुलगा संभाजीसह कैद केले. प्रतिस्पर्ध्याच्या राजवटीतही शिवाजी महाराज हिंमत हारले नाही. अन् युक्तीने आग्रावरुन निसटून रायगडावर पोहचले. तेथे त्यांनी पुन्हा लोकांना एकत्र केले आणि पुरंदरच्या तहात गमावलेला भाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

====

हे देखील वाचा: मणिरत्नमचे हे सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही पाहिले नसतील तर काय पाहिले, पाहा OTT वर

====

राज्याभिषेक सोपा नव्हता

राज्यांचे संघटन आणि सामर्थ्यशाली होण्यासाठी त्याला पूर्ण शासक व्हायचे आहे हे शिवाजी महाराजांना आतापर्यंत कळून चुकले होते. तथापि, सामाजिक-जातीय समस्यांमुळे, सनातनी लोक त्यांना राज्यकर्ता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यावेळचे राज्यकर्ते फक्त क्षत्रिय वंशाचे लोक मानले जात होते.

छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नसल्याचे कारण देत त्यांना विरोध केला जात होता. यानंतर काशीच्या गागा भट्टांच्या घराण्याकडून खात्री करून घेऊन शिवाजी महाराजांनी मराठवाड्यातील ब्राह्मणांना राज्याभिषेकासाठी राजी केले. अखेर 6 जून 1674 रोजी संपूर्ण रीतिरिवाजांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....