Home राजकारण भाकरी फिरवण्याची वेळ आलीय… शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले
राजकारणराज्य

भाकरी फिरवण्याची वेळ आलीय… शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले

9
Sharad Pawar
Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकरण चांगलेच तापले गेले आहे. पवार यांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जात आहेत. खरंतर शरद पवार यांनी असे म्हटले होते की, आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय, कारण असे केले नाही तर ती जळेल. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे असे म्हणणे आहे की, हे विधान अजित पवारांना बाजूला सारण्यासाठी केले असावे. यावर अजित पवार यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी मुंबईतील युवा मंथन कार्यक्रमादरम्यान असे म्हटले होते की, कोणीतरी मला म्हटले भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती कडवट होते. आता भाकरी फिरवण्याची योग्य वेळ आली आहे. त्यात विलंब नको लावायला. याबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आग्रह करेन की त्यांनी यावर काम करावे.

अजित पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या विधानाचा लोक वेगवेगळा अर्थ काढत आहेत. यावर अजित पवारांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, पवारांनी आपल्या ५५-६० वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक वेळा भाकरी फिरवली आहे. म्हणजेच पक्षात फेरबदल केला आहे. आम्ही पाहिले आहे की, नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली गेलीय. त्यांची पदोन्नती ही केली गेलीयं, ३८-४० वर्षाच्या वयातच आम्हाला सुद्धा संधी मिळाली होती. अजित यांनी पुढे असे म्हटले की, आमच्या क्षेत्रातील सर्व लोकांना प्रमोशन हे उंच पदी असावे अशीच इच्छा असते.

अजित यांनी शरद पवारांच्या विधानाचे समर्थन करत म्हटले होते की, मला असे वाटते आमदार, खासदारच्या रुपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी. त्यांनी म्हटले की पक्षाची ही जुनी परंपरा आहे की जुने चेहऱ्यांना हटवून नवे चेहरे समोर येतात.

शरद पवारांच्या विधानामुळे खळबळ उडालीय
शरद पवार यांनी दिलेल्या या विधानावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. याआधी पवार यांनी २०२४ मध्ये मिळून निवडणूक लढवण्यासंबंधित एका उत्तरात असे म्हटले आहे की, मिळून काम करण्याची इच्छा आहे. पण केवळ इच्छा ही नेहमीच पुरेशी नसते. जागा वाटप, आणखी कोणता मुद्दा आहे की नाही अशा सर्व गोष्टींवर अद्याप चर्चा झालेली नाही, त्यामुळे मी कसे सांगू. (Sharad Pawar)

हे देखील वाचा- समलैंगिक लग्नासंबंधित मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान हे विधान शरद पवारांनी केले आहे. अजित पवारांनी असे म्हटले आहे की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एनसीपीमध्येच राहणार आहे. मात्र असे बोलल्यानंतर ही चर्चा कायमच आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी असे म्हटले की, काँग्रेस अशा लोकांसोबत पुढे जाईळ जे एमवीए गंठबंधनात राहतील.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...