Home गाजावाजा स्पेशल दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा केला जातो?
गाजावाजा स्पेशल

दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा केला जातो?

10
National Girl Child Day
National Girl Child Day

भारतात प्रत्येक वर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुली आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कोरत आहे. परंतु भारतातील अशा काही ठिकाणी अद्याप मुलींना जन्म देणे नकोसे वाटते. मुलगा-मुलीमध्ये ही भेदभाव केला जातो. मात्र देशातील सरकारने मुलींना प्राधान्य देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. याच उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली होती. देशातील मुलींना सशक्त बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृकता वाढण्यासाठी हा खास दिवस आहे. (National Girl Child Day)

२४ जानेवारीलाच का साजरा केला जातो?
प्रत्येक वर्षी २४ जानेवारीला बालिका दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. तर भारतातील पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात याचे कारण आहे. वर्ष १९६६ मध्ये इंदिरा गांधींनी देशातील पहिल्या महिला पंतप्रधानांच्या रुपात शपथ घेतली होती.

भारताच्या इतिहासात आणि महिलांच्या सशक्तीकरणास्तव २४ जानेवारीचा दिवस फार महत्वपूर्ण आहे. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देष असा की, देशातील मुलींना त्यांच्या मुलभूत हक्कांच्या प्रति जागृक करणे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
समाजात मुलींसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल देशातील मुलींसोबत सर्व लोकांना जागृक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशात प्रत्येक वर्षी राज्य सरकार आपल्या देशात मुलींच्या प्रति जागृक कार्यक्रमांसंदर्भातील आयोजन करते.

दरम्यान, गेल्या वर्षात राष्ट्रीय बालिका दिवस आणि आझादी का अमृत मोहत्सवचे औचित्य साधत राष्ट्रीय बाल पुरस्कार आयोजित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी वर्च्युअली बातचीत केली होती. या व्यतिरिक्त विविध राज्याकडू काही राजकीय पक्ष हे बालिका दिवसाचे आयोजन करतात. जेणेकरुन मुलींबद्दल समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल.(National Girl Child Day )

यंदाच्या वर्षाची थीम
२०२१ मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस ‘डिजिटल पीढी, आपली पिढी’ च्या थीमवर साजरा केला गेला. या व्यतिरिक्त वर्ष २०१९ मध्ये याची थीम ‘उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सशक्तीकरण’ आणि २०२३ मध्ये यासंदर्भातील थीमची घोषणा करण्यात आलेली नाही.

हे देखील वाचा- राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कशा पद्धतीने निवडले जातात मुलं?

मुलींच्या हितासाठी प्रयत्न
देशभरात मुलींना समान हक्क मिळवून देण्यासाठी समाजात भारत सरकारकडून विविध योजनांची सुरुवात केली आहे. तर मुलींच्या हितासाठी सरकारद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चे आयोजन ही या अंतर्गत केले जाते. ही योजना सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी लॉन्च केली होती. भ्रुण हत्या, मुलींच्या जन्माबद्दलचा अंधविश्वास आणि मुलगा-मुली मध्ये फरक करणे असे विविध मुद्दे या दिवसाच्या माध्यमातून उचलले जातात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....