Home गाजावाजा स्पेशल Religious संध्याकाळी झाडांना हात न लावण्यामागे आहे मोठे कारण; जाणून घ्या त्याबद्दल
गाजावाजा स्पेशल

Religious संध्याकाळी झाडांना हात न लावण्यामागे आहे मोठे कारण; जाणून घ्या त्याबद्दल

12
Religious

आपण अनेकदा आपल्या घरातील वडिलधाऱ्यांकडून ऐकले आहे की, रात्र किंवा संध्याकाळ झाली की, झाडांना हात लावू नये. फुलं तोडू नये. आपल्याला कधी कधी त्यांच्या सांगण्याचा, त्यांच्या या बोलण्याचा त्रास होतो, राग येतो. मात्र त्यामागे नक्की काय कारण आहे हे विचारत नाही. मात्र खरंच संध्याकाळी, रात्री झाडांना हात लावू नये आणि फुलं तोडू नये. यामागे एक कारण आहे. मात्र ते कोणते हे आपण आज जाणून घेऊया. (Religious)

आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा लिहून ठेवले आहे. ज्या गोष्टी आपल्यासाठी शुल्लक विनाकारण आहे, त्यांना देखील मोठा अर्थ सांगितला आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी देवपूजा होते आणि नंतर देवाला फुलं वाहिली जातात. ही फुलं सुवासिक, ताजी आणि सुंदर असावी असा सर्वांचाच आग्रह असतो. त्यासाठी काही लोकं रात्रीच फुलं तोडून फ्रिजमध्ये ठेवतात. काही लोकं मजा म्हणून रात्री फुलं किंवा झाडाची पाने तोडतात. मात्र असे करण्यास हिंदू धर्मामध्ये मनाई करण्यात आली आहे. (Top News)

सनातन धर्मानुसार झाडे आणि वनस्पतींना देखील जिवंत असतात. सूर्यास्तानंतर ही झाडे आणि वनस्पती यांचा विश्रांतीचा काळ सुरु होतो आणि ते विश्रांती घेतात. या दरम्यान जर आपण संध्याकाळी झाडांना आणि फुलांना स्पर्श केला तर त्यांच्या रामाच्या वेळेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो. कोणाचीही झोप उडवणे किंवा त्याला त्रास देणे हे हिंदू धर्मात वाईट कृत्य मानले गेले आहे. म्हणून रात्री झाडांना आणि फुलांना हात न लावण्याबद्दल सांगितले जाते. (Special Story)

Religious

सनातन धर्मामध्ये वनस्पती, झाडे, झुडपे यांना देखील सजीव मानले गेले आहेत. इतर सर्व सजीवांप्रमाणे झाडे देखील सकाळी उठतात आणि संध्याकाळी विश्रांती घेतात. ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला विनाकारण उठवणे अयोग्य आणि पापी मानले जाते, त्याचप्रमाणे झाडे आणि झाडे देखील संध्याकाळनंतर झोपतात, म्हणून त्यांना स्पर्श केल्याने किंवा संध्याकाळनंतर त्यांची फुले, पाने तोडल्याने त्यांना त्रास होतो. शिवाय ही झाडे अनेक पशु, पक्षी यांच्या विसाव्याचे ठिकाण देखील असते. रात्री झाडांसोबतच हे पशु, पक्षी देखील विश्रांती घेतात. आपण झाडांना हात लावला तर या पक्ष्यांना देखील त्रास होईल म्हणूनच रात्री झाडांना हात लावू नये.

रात्री झाडांना हात न लावण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, दिवसभर बहरात राहिल्यानंतर सूर्यास्तानंतर फुलांचा सुगंध आणि सौंदर्य दोन्ही नाहीसे होतात. अशी फुले तोडून मग देवांला वाहिल्यास आपल्याला या पूजेचे फळ मिळत नाही. आणि रात्री फुलांना, झाडांना हात लावण्याचे पाप देखील लागते.

=============

हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !

America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !

=============

यासोबतच रात्री किंवा संध्याकाळी फुले न तोडण्यामागे आणि वनस्पतींना हात न लावण्यामागे एक महत्वाचे आणि मोठे वैज्ञानिक कारण देखील आहे. विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर झाडे दिवसभर कार्बन डायऑक्साइड शोषतात आणि ऑक्सिजन सोडतात. मात्र संध्याकाळी हीच झाडे उलट प्रक्रिया करतात. अर्थात झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात. म्हणून, रात्री झाडे आणि झाडे जवळ झोपणे, त्यांना स्पर्श करणे किंवा तोडणे प्रतिबंधित आहे.

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....