Home गाजावाजा स्पेशल दिवा विझणे खरंच अशुभ मानले जाते? वाचा काय म्हणतात ज्योतिषी
गाजावाजा स्पेशल

दिवा विझणे खरंच अशुभ मानले जाते? वाचा काय म्हणतात ज्योतिषी

8
Jytoishshatra
Jytoishshatra

हिंदू धर्मात काही मान्यता आणि परंपरा आहेत. त्यानुसार हिंदू धर्मातील लोक देवाची मोठ्या भक्तिभावाने पुजा करतात. मात्र पूजा करताना काही गोष्टींची सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरुन देवाचा आशीर्वाद-कृपा आपल्यावर नेहमीच राहते. अशाच विविध मान्यतांपैकी मान्यतांपैकी एक म्हणजे पुजेतील दिवा विझणे. सनातन धर्मात अशी कोणतेही पूजा-पाठ नाही ज्यामध्ये दिवा लावला जात नाही. अशी मान्यता आहे की, पूजा करतेवेळी देवी-देवतांची आरती केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच प्रत्येक पूजेवेळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा लावून आरती केल्याने आयुष्यातील अंध:कार दूर होतो आणि व्यक्तीच्या आयुष्यात उजेड आणि ज्ञानाचे आगमन होते. जर आरती करतेवेळी दिवा विझला तर काय होते? तर जाणून घेऊयात ज्योतिष याबद्दल नक्की काय सांगतात. (Jytoishshatra)

अशी मान्यता आहे की, जर पुजेवेळी दिवा विझला तर पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होण्यास काही अडथळे येऊ शकतात. पूजेत दिवा विझणे म्हणजे देवी-देवता नाराज असल्याचे सुद्धा संकेत देतात. आणखी एका मान्यतेनुसार, दिवा विझण्याचे संकेत व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करत नाही असे सुद्धा होतात. दरम्यान, दिवा विझण्याची काही कारणे असू शकतात.

Jytoishshatra
Jytoishshatra

विद्वानांचे असे मानणे आहे की, जर पुजेदरम्यान दिवा विझल्यास तुम्ही देवापुढे हात जोडून माफी मागू शकता आणि नंतर दिवा पुन्हा प्रज्वलित करु शकता. पूजा करतेवेळी दिवा लावताना काही सावधगिरी सुद्धा बाळगली पाहिजे. कोणताही व्यक्ती पूजा करत असेल तर त्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, आरतीवेळी दिवा विझू देऊ नये. त्यासाठी दिवा तयार करताना त्याची जरुर काळजी घ्यावी. दिव्यात योग्य प्रमाणत तेल किंवा तूप आहे की नाही हे सुद्धा पहावे.

दिव्यात वापरण्यात येणाऱ्या वातीसाठी कापूस ही उत्तम प्रकारचा असावा. या व्यतिरिक्त ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की, ज्या ठिकाणी आरती करत आहात तेथे अधिक वारा येत असेल तर दिवा विझणार नाही अशा पद्धतीने तो ठेवावा. तसेच आसपास एखादा पंखा, कूलर सुरु असेल तर तो ही बंद करणे योग्य ऑप्शन असेल.(Jytoishshatra)

हे देखील वाचा- दिवाळीच्या १५ दिवसानंतर लागणार अखेरचे चंद्र ग्रहण, सूतक काळापूर्वी साजरी होणार देव दिवाळी

तसेच संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवा लावण्याची वेळ असते तेव्हा सुद्धा काही गोष्टी करणे टाळाव्यात. जसे की, झोपणे, केर काढणे. अशाने घरात येणारी देवी दरवाजातूनच निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे दिवा लावताना या गोष्टी करणे टाळाव्यातच पण घरात अशुभ आणि वाईट गोष्टींबद्दल ही बोलणे टाळावे असे सांगितले जाते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....