Home राष्ट्रीय इंडोनेशियाची राजधानी बदलली जाणार
राष्ट्रीय

इंडोनेशियाची राजधानी बदलली जाणार

8
Indonesia New Capital
Indonesia New Capital

ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदलावामुळे जगातील बहुतांश शहर बुडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. या शहरांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाची राजधानी जकार्ताचा सुद्धा समावेश आहे. केवळ हेच एक कारण नाही आहे की, इंडोनेशिया आपली राजधानी बदलत आहे. इंडोनेशियाई सरकार सध्या राजधानी जकार्ताला सोडून बोर्निया बेटावर घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. (Indonesia New Capital)

अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, नवी राजधानी बोर्नियो येथे वसवली जाणार आहे. जी एक सस्टेनेबल फॉरेस्ट सिटी असणार आहे. दावा केला आहे की, नवे शहर पर्यावरणाला लक्षात घेता विकसित केले जाणार आहे. याचे लक्ष्य वर्ष २०४५ पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन असणार आहे. अशातच प्रश्न विचारला जात आहे की, अशी वेळ का आली आहे? नवी राजधानी कशी असणार आहे आणि जेथे शहर वसवले जाणार आहे तेथे नागरिकांना जाण्यास बंदी का आहे?

का बदलली जातेय राजधानी
इंडोनेशियाची सध्याची राजधानी जकार्ताची लोकसंख्या एक कोटींच्या आसपास आहे. याच्या आसपास तीनपट लोकसंख्या आहे. जर्काताला जगातील सर्वाधिक वेगाने बुडणारे शहर सांगितले जात आहे. जावा समुद्रात जकार्ता डुबण्याच्या सध्याच्या दराच्या आधारावर असा अनुमान लावला जात आहे की, २०२५० पर्यंत या शहराचा एक तृतीयांश हिस्सा पाण्याखाली जाऊ शकतो.हवामान बदलाबरोबरच भूजलाचा अनियंत्रित शोषण हेही यामागचे प्रमुख कारण आहे.

जकार्तमध्ये प्रदुषणाचा स्तर वाढला जात आहे. येथील हवा आणि पाणी प्रदुषित झाले आहे. प्रत्येक वर्षाला पुर येतो आणि त्यामुळे रस्ते बंद होतात. पुर ओसरल्यानंतर सर्वत्र घाण परसते. त्याच्या स्वच्छतेसाठी सरकारला प्रत्येक वक्षी ४.५ बिलियन डॉलरचा खर्च पडतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी राष्ट्रपती जोको विडोडो यांनी नवी राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

कशी असणार आहे नवी राजधानी?
इंडोनेशियाच्या नव्या राजधानीच्या रुपात सरकारने बोर्नियो बेटावर नुसंतारा शहर वसण्याचा विचार केला आहे. बोर्नियो बेटाच्या रुपात एक टिकाउ शहर बनवण्याचे लक्ष्य आहे. जावा शब्द नुसंताराचा अर्थ असा की, द्वीपसमूह. नव्या राजधानीत लोकसंख्या मर्यादित ठेवली जाणार आहे. (Indonesia New Capital)

हे देखील वाचा- चीन आणि रशियामधील संबंध जगात स्थिरता आणतील का?

सरकारने बोर्नियो माजी कालीमंतन प्रांतात २५६००० हेक्टर विशाल शहर वसण्याची योजना तयार केली आहे. इंडोनेशियातील सरकार जमिनीच्या स्तरातून शासकीय भवन आणि अधिकाऱ्यांचे निवास बनवू पाहत आहे. सुरुवातीला अनुमान असा होता की, १.५ मिलियनपेक्षा अधिक सिविल अधिकाऱ्यांना जकार्ता येथून २००० किमी उत्तर-पूर्व ट्रांन्सफर केले जाईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...

Anil Ambani
राष्ट्रीयराष्ट्रीय

Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ED चा छापा

भारतातील नावाजलेले उद्योजक असलेल्या अनिल अंबानींवरील संकटाचे ढग काही केल्या कमी होताना...