Home गाजावाजा स्पेशल इंडोनेशियाला ‘रिंग ऑफ फायर’ देश असे का म्हटले जाते?
गाजावाजा स्पेशल

इंडोनेशियाला ‘रिंग ऑफ फायर’ देश असे का म्हटले जाते?

8
Indonesia Earthquakes
Indonesia Earthquakes

इंडोनेशिया असा एक देश आहे जेथे नैसर्गिक संकट खुप येतात. नुकत्याच तेथे जावा येथे ५.६ तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के बसल्याने खुप नुकसान झाले. यामध्ये १६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले. याच वर्षात इंडोनेशियात ४ मोठे भुकंप झाले ज्याची तीव्रता ५.५ ते ६.६ ऐवढी होती. इंडोनेशियात भुकंप येत असल्याने त्या देशाला ‘रिंग ऑफ फायर’ असे ही म्हटले जाते. येथे केवळ भुकंपच नव्हे तर ज्वालामुखी आणि त्सुनामीचा सुद्धा धोका असतो. हा असा देश आहे जेथे सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. (Indonesia Earthquakes)

जगभरातील भुकंपांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी संस्था युएसजीएस यांच्यानुसार इंडोनेशियात नेहमीच भुंकपासंदर्भात संवेदनशील असतात. येथे १९०१ ते २०१९ च्या कालावधीत ७ पेक्षा अधिक तीव्रतेचे १५० हून अधिक भुकंप आले आहेत.

येथे ज्वालामुखीचा सातत्याने फुटतो किंवा सक्रिय होत राहतो. इंडोनेशियात काही सक्रिय ज्वालामुखी आहेत, ज्यामध्ये कधी कोणते सक्रिय होतील हे कळत नाही. तेव्हा तातडीने ३ ते ७ किमी पर्यंतच्या परिसरातील गाव खाली केली जातात. जेणेकरुन वाहणारा लावा आणि आगीसह पसरवणाऱ्या राखेपासून बचाव होऊ शकतो. ४ वर्षांपूर्वी इंडोनेशियात ज्वालामुखी फुटला आणि त्याच्यसोबत त्सुनामी सुद्धा आली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. या त्सुनामीत जवळजवळ २० मीटर उंचीच्या लाटा सुद्धा उसळल्या गेल्या.

Indonesia Earthquakes
Indonesia Earthquakes

इंडोनेशियात नेहमीच येतात भुकंप आणि त्सुनामी
इंडोनेशियात सातत्याने येणारे भुकंप आणि त्सुनामी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. तेथे सातत्याने भुकंप येतात. जेणेकरून या संपूर्ण देश बेटांच्या आधारावर समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा त्या दरम्यान आहे, पण भुकंप येतात तेव्हा त्सुनामी ठरवली जाते. त्याचसोबत समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याकारणाने या देशातील काही भागात पाण्याची पातळी वाढण्याचा धोका उद्भवून बुडण्याचा सुद्धा धोका असतो.

इंडोनेशियात का येताता ऐवढी नैसर्गिक संकट?
त्यानंतर सातत्याने हा प्रश्न लोकांच्या मनात आहे की, अखेर इंडोनेशियात असे काय आहे की, तेथे सर्वाधिक नैसर्गिक संकट येतात. खरंतर इंडोनेशिया, जावा आणि सुमात्रा सारख्या देशांमध्ये असे होते कारण या परिसर रिंग ऑफ फायर परिसरात येतात. प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील हा परिसर जगातील सर्वाधिक धोकादायक भू-भाग आहे. (Indonesia Earthquakes)

हे देखील वाचा- जगातील लोकसंख्या वाढून ८ करोड झाली खरी पण मोजली कशी? जाणून घ्या अधिक

काय आहे रिंग ऑफ फायर?
इंडोनेशिय एक अॅक्टिव्ह भुकंप झोन मध्ये आहे. हेच कारण आहे की, येथे अधिक भुकंप येतात. इंडोनेशिया प्रशांत महासागरात स्थित रिंग ऑफ फायरचा हिस्सा आहे. रिंग ऑफ फायर प्रशांत महासागराच्या बेसिनच परिसर आहे. येथे काही ज्वालामुखी फुटत राहतात आणि मोठ्या प्रमाणात भुकंपाचे झटके जाणवले जातात. भुकंपाच्या कारणास्तव याच्या आसपासच्या समुद्रात त्सुनामीचा जन्म होतो. हा रिंग ऑफ फायरचा परिसर जवळजवळ ४० हजार किमीमध्ये पसरला गेला आहे. येथे जगातील एकूण अॅक्टिव्ह ज्वालामुखींपैकी ७५ टक्के ज्वालामुखी आहे.

अमेरिकेतील जियोलॉजिकल सर्वेच्या एका रिपोर्टनुसार, या परिसरात जगातील ९० टक्के भुकंप येतात. त्याचसोबत मोठ्या भुकंपांपैकी सुद्धा ८१ टक्के या परिसरात येतात. येथे येणाऱ्या भुकंपाचा थेट संबंध जमिनीखाली येणारी प्लेट सरकल्यामुळे आहे. त्याच्या घसरण्याचे कारण अॅक्टिव्ह ज्वालामुखी सुद्धा असते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....