Home गाजावाजा स्पेशल आयुष्यातील दु:ख दूर करण्यासाठी गौतम बुद्धांचे हे विचार जरुर वाचा
गाजावाजा स्पेशल

आयुष्यातील दु:ख दूर करण्यासाठी गौतम बुद्धांचे हे विचार जरुर वाचा

10
Gautam Buddha thoughts
Gautam Buddha thoughts

बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी नेहमीच लोकांना अहिंसा आणि करुणेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे अनमोल विचारांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे. हेच कारण आहे की, बुद्धांचे विचार हे सुखी जीवनाचे सुत्र असल्याचे म्हटले जाते. गौतम बुद्धांनी लोकांना दु:खाचे सत्य जगातील सर्वांना दाखवून देतात. प्रत्येक व्यक्तीला सुखी आणि संपन्न व्हायचे आहे. परंतु गौतम बुद्धांचे असे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे निसर्ग आणि ऋतूत बदल होतो त्याच प्रमाणे मनुष्याच्या आयुष्यात सुद्धा सुख-दु:ख येत राहतात. (Gautam Buddha thoughts)

समाजात कोणीही किती धनवान असो. पण असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याच्या आयुष्यात दु:ख नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, आयुष्यात ना सुख हे स्थिर आहे ना दु:ख. जर तु्म्ही एका काळासाठी आनंदाचा अनुभव घेता तर दु:ख ही तुमच्या वाट्याला येणार आहे. पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस दु:ख ही कायमची निघून गेली नाही तरीही त्यात मार्ग काढून सुखी कसे रहायचे हे तुम्हाला कळू शकते.

गौतम बुद्ध असे म्हणतात की, दु:खाचे कारण काहीही असो. परंतु दु:खाचे पालनकर्ता हा मनुष्य स्वत: आहे. दु: ख वाढवण्यामागे ही मनुष्यच असतो. जर तुम्ही एखाद्या समस्येत असाल तर त्याचा अधिक प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका. परिस्थिती कशी ही असो स्वत:ला धैर्यवान करा. यामुळे तुम्हाला दु:खातून सुटका जरुर मिळेल. जाणून घेऊयात गौतम बुद्धांचे विचार दु:ख दूर करण्याबद्दल काय सांगतात याच बद्दल अधिक.

-दु:ख समजून घ्या
गौतम बु्द्धांनुसार, प्रत्येक व्यक्ती लहान-मोठ्या गोष्टीवरुन दु:खी होतो. परंतु दु:खी राहत असाल तर त्याचे कारण ही समजून घेतले पाहिदे. यासाठी तुम्ही तुमच्या दु:खांची कारणं समजून घ्या. जर तुम्ही विचार न करता, न समजून घेता त्याचा प्रभाव तुमच्यावर अधिक होऊ देत असाल तर समस्या अधिक वाढल्या जातील. यामुळे तुम्हाला नेहमीच तुमच्यासमोर दु:खाचा डोंगर दिसेल. त्यामुळे दु:खापासून दूर रहायचे असेल तर जो पर्यंत तुम्ही स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत तो पर्यंत दु:ख आपल्यापासून दूर जाणार नाही. (Gautam Buddha thoughts)

-तीव्र इच्छा हेच दु:खाचे कारण
बुद्धांनुसार दु:खाचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे तृष्णा. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे किंवा असमाधानी असणे हेच दु:खाचे कारण आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजेपेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीची इच्छा करु नये. कोणाकडून ही अधिक अपेक्षा करु नये. जर तुम्ही तुमच्या इच्छांवर कंट्रोल कराययला शिकलात तरच दु:ख दूर होऊ शकते.

हेही वाचा- कंबोडियातील प्राचीन भारतीय मंदिरांचा इतिहास

-दु:ख असे दूर होईल
गौतम बुद्ध असे म्हणतात की, आयुष्यात जसे दु:ख असते तसेच आनंदाचे दिवस ही येतात.जसे आजचा दिवस वाईट तर उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल. जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्यासाठी त्यावर उपाय नाही.तुम्ही तर वरील काही गोष्टी समजून घेतल्या तरच दु:ख दूर होऊ शकते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....