Home गाजावाजा स्पेशल Divorce Laws : घटस्फोट झाल्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर मुलांचा संपत्तीत किती अधिकार असतो?
गाजावाजा स्पेशल

Divorce Laws : घटस्फोट झाल्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर मुलांचा संपत्तीत किती अधिकार असतो?

9
Divorce
There is talk of divorce of the actor marathi info

Divorce Laws : सध्या बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स पतीच्या संपत्तीचा मुद्दा कोर्टापर्यंत पोहोचला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, तीन पक्ष संजय कपूरच्या संपत्तीवर हक्क दाखवत आहेत. यामध्ये त्याची पत्नी प्रिया कपूर, त्याची आई राणी कपूर आणि त्याची एक्स पत्नी करिश्मा कपूरच्या मुलांचा समावेश आहे. हा वाद जवळजवळ 10 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरुन सुरू आहे. अशातच घटस्फोट झाल्यानंतर पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांचा संपत्ती किती अधिकार असतो याबद्दल खाली जाणून घेऊया.

भारतीय वारसा कायद्यानुसार (Hindu Succession Act, 1956), मुलांचा हक्क हा पित्याच्या मृत्यूनंतर कायम राहतो, मग पती-पत्नीचे घटस्फोट झालेले असो वा नसो. घटस्फोटानंतर पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर वारशाचा हक्क राहत नाही, मात्र मुलांना तो पूर्णपणे मिळतो. यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान अधिकार असतो. पित्याची मालमत्ता जर ‘स्वत:ची संपत्ती’ (self-acquired property) असेल तरी ती मुलांना समान प्रमाणात मिळते. जर पित्याची मालमत्ता ‘पैतृक संपत्ती’ (ancestral property) असेल, तर देखील मुलांना कायदेशीर हिस्सा मिळतो. म्हणजेच घटस्फोट मुलांच्या वारसा हक्कावर परिणाम करत नाही.

पित्याच्या मृत्यूनंतर संपत्तीचे वाटप

जर पतीचा मृत्यू झाल्यानंतर तो वसीयत (Will) न करता गेला असेल, तर त्याची संपत्ती कायदेशीर वारसांमध्ये वाटली जाते. या वारसांमध्ये पत्नी, मुलं आणि आई यांचा समावेश होतो. घटस्फोट झाल्यास पत्नीला हा अधिकार मिळत नाही, पण मुलं मात्र ‘Class I heirs’ या गटात येतात, त्यामुळे त्यांचा हिस्सा सुरक्षित राहतो. उदाहरणार्थ, जर पित्याचा मृत्यू झाला आणि त्याला दोन मुलं असतील, तर त्याची संपत्ती मुलांमध्ये समान वाटली जाईल.

Divorce Law
Divorce Law

करिश्मा कपूरचा घटस्फोट आणि मुलांच्या हक्काचा संदर्भ

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने सन 2016 मध्ये तिचा पती संजय कपूर याच्याशी अधिकृत घटस्फोट घेतला. या घटस्फोटाच्या वेळी कोर्टाने मुलं समायरा आणि कियान यांची कस्टडी करिश्माकडे दिली. कायदेशीर दृष्टीने पाहता, संजय कपूर यांचा मृत्यू झाल्यास मुलांना त्यांच्या संपत्तीत समान हक्क मिळणार आहे. करिश्मा कपूरला मात्र या संपत्तीत हक्क मिळणार नाही, कारण ती घटस्फोटित आहे. पण मुलांचा वारसा हक्क हा घटस्फोटामुळे कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही.

वसीयत असल्यास स्थिती

जर मृत व्यक्तीने आपल्या आयुष्यात वसीयत केली असेल, तर त्यानुसार संपत्ती वाटली जाते. वसीयतमध्ये जर मुलांना संपत्तीचा उल्लेख असेल, तर त्यांना त्यानुसार हक्क मिळतो. मात्र वसीयत नसल्यास हिंदू उत्तराधिकार कायदा (Hindu Succession Act) लागू होतो आणि मुलांना आपोआप हिस्सा मिळतो. त्यामुळे अनेकदा मोठ्या कुटुंबांमध्ये वाद टाळण्यासाठी लोक वसीयत तयार करून ठेवतात.

=========

हे देखील वाचा : 

Mossad Operations : पलीस्तिनी दहशतवाद्यांनी इस्राईलच्या ११ खेळाडूंना मारलं !

Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

Algeria History : एका मच्छर मारायच्या बॅटने दोन देशांमध्ये पेटवला ७३ वर्षांचा संघर्ष !

==========

घटस्फोट पती-पत्नीमधील नातेसंबंध संपवतो, पण पती-पत्नीच्या मुलांच्या हक्कांवर त्याचा परिणाम होत नाही. मुलं नेहमीच पित्याच्या संपत्तीची कायदेशीर वारस असतात. करिश्मा कपूरच्या प्रकरणातही हेच लागू होतं – तिच्या मुलांना संजय कपूर यांच्या संपत्तीत पूर्ण हक्क असेल, जरी दोघांचा घटस्फोट झालेला असला तरी. त्यामुळे भारतीय कायद्याच्या दृष्टीने मुलांचा वारसा हक्क हा घटस्फोटानंतरही अबाधित राहतो आणि त्यांचं भविष्य सुरक्षित राहतं.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....