Home गाजावाजा स्पेशल सूर्यास्तानंतर करु नका ‘ही’ कामे अन्यथा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल
गाजावाजा स्पेशल

सूर्यास्तानंतर करु नका ‘ही’ कामे अन्यथा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल

12
Astro Tips
Astro Tips

ज्योतिष शास्रानुसार काही कामं अशी असतात जी सुर्यास्तानंतर करु नये. कारण ती कामे करणे म्हणजे अशुभ मानले जाते. शास्रात या वेळेला फार महत्वपूर्ण मानले आहे. आपण आपल्या आजी-आजोबांकडून किंवा वडिलोपार्जिक लोकांकडून ऐकले असेल की, काही कामे ही सुर्यास्तानंतर करु नयेत. जसे की, संध्याकाळच्या वेळी झोपू नये किंवा कचरा काढू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते. अशातच तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्रानुसार, या वेळेत घरात देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांचे आगमन होत असते. त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक असते. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना ही करावा लागेल अशी समस्या ही उद्भवू शकते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कशी कोणती कामे आहेत जी करणे टाळले पाहिजे.(Astro Tips)

-संध्याकाळच्या वेळेस झोपू नये
असे मानले जाते की, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरवण्यात आलेली असते. ज्योतिष शास्रानुसार असे सांगितले जाते की, संध्याकाळच्या वेळेस झोपू नये. कारण असे केल्याने वय कमी होते आणि काही आरोग्या संबंधित समस्यांचा ही सामना करावा लागतो. या व्यतिरिक्त घरात देवीचे आगमन होत असताना तुम्ही झोपलात तर ती प्रसन्न कशी होईल. तसेच संध्याकाळच्या वेळेस घराचा दरवाजा बंद ठेवू नये.

हे देखील वाचा- आषाढी एकादशीला निघते पंढरपूरची दिंडी यात्रा, जाणून घ्या याच्याशी संबंधित रंजक गोष्टी

Astro Tips
Astro Tips

-तुळशीवृंदावनला हात लावू नका
ज्या घरात तुळशीचे झाडं किंवा तुळशीवृंदावन असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस त्याला हात लावणे टाळावे. कारण असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. खरंतर ज्या घरात तुळशीची दररोज पूजा केली जाते तेथे देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच सदैव त्यांच्यावर असते. आणखी महत्वाचे म्हणजे, तुळशी जवळ संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकता पण त्याला पाणी घालू नका.(Astro Tips)

-सूर्यास्तानंतर घरात किंवा अंगणात कचरा काढू नये
शास्रानुसार, सूर्यास्त आणि संध्याकाळच्या वेळेस केरकचरा काढू नये. असे मानले जाते की, या दरम्यान देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही झाडू काढत असाल तर देवी घरातून निघून जाईल. परिणामी तुम्हाला आर्थिक समस्या आणि आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल.

Astro Tips
Astro Tips

-केस किंवा नखं कापणे
सूर्यास्तानंतर घरात केस किंवा नखं कापू नये. ऐवढेच नव्हे तर पुरुषांनी शेविंग करण्यापासून दूर रहावे. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. असे ही मानले जाते की, केसं किंवा नखं संध्याकाळच्या वेळेस कापल्यास आपल्या घरावर कर्ज वाढते.

-अन्न उघडे ठेवणे
सूर्यास्तानंतर भोजन किंवा पाणी उघडे ठेवू नये. या गोष्टी नेहमीच झाकून ठेवल्या पाहिजेत. परंतु उघडे ठेवल्यास घरात नकारात्मकता पसरते. परिणामी तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....