Home गाजावाजा स्पेशल ममता बॅनर्जींकडून २१ जुलै शहीद दिवस का साजरा केला जातो? नक्की काय झाले होते या दिवशी
गाजावाजा स्पेशलराजकारण

ममता बॅनर्जींकडून २१ जुलै शहीद दिवस का साजरा केला जातो? नक्की काय झाले होते या दिवशी

8
Shahid Diwas
Shahid Diwas

तृणमुल काँग्रेसने आपल्या स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी २१ जुलै हा शहीद दिवस (Shahid Diwas) म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती आणि तो आजही केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडून या दिवशी एक मोठी रॅली काढली जाते. दरम्यान गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही रॅली काढण्यात आली नव्हती. पण टीएमसीने हा शहीद दिवस त्या काळात प्रतिकात्मक रुपात साजरा केला होता. मात्र यंदा टीएमसीकडून शहीद दिवसानिमित्त मोठे आयोजन करण्यात आले आहे. पण २१ जुलै नक्की असे काय झाले होते त्यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडून आजचा दिवस हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो?

आजच्या शहीद दिवसानिमित्त रॅली ही कोलकाता येथील एस्प्लांजे रोड येथे टीएमसीद्वारे आय़ोजित एक वार्षिक कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम २१ जुलै, १९९३ मध्ये झालेल्या एका घटनेची आठवण करुन देतो. कराण ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाली युवा काँग्रेसकडून काढण्यात आलेली एका विरोध रॅली दरम्या पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून १३ काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

हे देखील वाचा- भाजपाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना ममता बॅनर्जी यांनी केले होते ब्लॉक .. 

Shahid Diwas
Shahid Diwas

असे मानले जाते की, ही घटना ममता बॅनर्जी यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी लावणारी होती. ममता बॅनर्जी त्या वेळी काँग्रेस नेत्या होत्या आणि पश्चिम बंगालच्या तरुण काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी एका रॅलीचे नेतृत्व केले होते आणि निवडणूकीत पारदर्शकता आणावी म्हणून फोटो वोटर कार्डवर लागू करावेत अशी मागणी केली होती. ममता बॅनर्जी या घटनास्थळापासून एक किलोमीटर लांब होत्या. त्याचवेळी रॅलीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये १३ काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.(Shahid Diwas)

घटनेनंतर ममता बॅनर्जींना मिळाली जनतेची सहानभुती

या घटनेनंतर ममता बॅनर्जींसाठी जनतेकडून सहानभुती मिळाली. कारण ममता बॅनर्जी त्या वेळी एक उगवता राजकीय नेता होता. या घटनेच्या चार वर्षानंतर त्यांनी टीएमसी पक्षाची स्थापना केली. जो २०११ मध्ये बंगाल मध्ये सत्तेत आली. सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घटनेचा तपास करण्यासाठी सुशांतो चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील एक न्यायिक आयोगाची स्थापना केली. तर १९९३ मध्ये झालेल्या घटनेनंतर टीएमसीकडून प्रत्येक वर्षी त्या १३ कार्यकर्त्यांच्या आठवणीत रॅलीचे आयोजन करते, त्यांना ते शहीद म्हणून संबोधतात. या घटनेमुळेच ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष प्रत्येक वर्षी शहीद दिवस हा २१ जुलै रोजी साजरा करतात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....