Home गाजावाजा स्पेशल भारतातील असे शहर जेथे फुकटात राहता येते
गाजावाजा स्पेशल

भारतातील असे शहर जेथे फुकटात राहता येते

7
Auroville city
Auroville city

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध प्रकारच्या जाती, धर्माचे आणि विविध भाषिक लोक राहतात. देश असो किंवा परदेश, प्रत्येक ठिकाणची व्यवस्था ही सुरळीत चालवी म्हणून शासन आणि प्रशासनाची गरज भासते. मात्र असे एक शहर आहे जेथे कोणतेही सरकार नाही. तरीही या देशाचा कारभार हा पैशांशिवाय चालविला जातो. (Auroville city)

शासन-प्रशासनाशिवाय शासन चालते ही तर हैराण करणारी गोष्ट आहे.त्याचसोबत येथे जर तुम्हाला रहायचे-खायचे असेल तर त्यासाठी पैसे ही द्यावे लागत नाही. म्हणजेच तुम्ही फुकटात येथे आयुष्य जगू शकता. याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

ना शासन-प्रशासन ना धर्म ना पैसे लागतात अशा शहराचे नाव ‘ऑरोविले’ असे आहे. हे शहर चेन्नई पासून १५० किमी दूरवर विल्लुपुरम जिल्ह्यात तमिळनाडूत आहे. या शहराला Sun of dawn असे सुद्धा म्हटले जाते. खरंतर हे शहर वसवण्यामागे एक उद्देश होते. ते म्हणजे, येथे कोणत्याही भेदभावाशिवाय किंवा अस्पृश्यतेशिवाय लोकांना राहता येईल.

Auroville city
Auroville city

प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑरोविले शहर १९६८ मध्ये मीरा अल्फाजो द्वारे वसवण्यात आले होते. मीरा अल्फाजो १९१४ मध्ये पड्डुचेरीरीचे श्री अरबिंदो स्पिरिच्इल रिट्रीटमध्ये आल्या होत्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्या पुन्हा जापानमध्ये गेल्या. मात्र १९२० मध्ये पुन्हा परत आल्यानंतर १९२४ मध्ये श्री अरबिंदो स्पिरिचुअल संस्थेला जोडल्या गेल्या आणि जनसेवेत लागल्या.

ऑरोविले शहराला युनिव्हर्सल सिटी असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच येथे कोणीही येऊन राहू शकते. येथे जवळजवळ ५० देशांपेक्षा अधिक देशातील लोक राहतात आणि येथील लोकसंख्या २४००० ऐवढी आहे. येथे राहण्यासाठी केवळ एक अट मान्य करावी लागते. ती म्हणजे तुम्हाला येथे सेवक म्हणून रहावे लागते. (Auroville city)

हेही वाचा- ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार

येथे ना कोणताही धर्म आहे ना कोणत्याही देवता-देवीची पूजा होते. येथे केवळ एका मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्याला मातृमंदिर असे म्हटले जाते. येथील लोक मेडिटेशन आणि योगावर अधिक लक्ष देतात. २०१५ नंतर या शहरात खुप बदल झाले आहेत. या ठिकाणाचे फार कौतुक केले जाऊ लागले. युनेस्कोने सुद्धा या शहराचे कौतुक केले आहे. या शहराला भारत सरकारने सुद्धा समर्थन दिले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी सुद्धा येथे भेट दिली होती.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....