Home राजकारण नेहमी ट्रोल होणाऱ्या ‘रागा’चे नेटकऱ्यांनी का केले एवढे कौतुक…?
राजकारण

नेहमी ट्रोल होणाऱ्या ‘रागा’चे नेटकऱ्यांनी का केले एवढे कौतुक…?

7
Rahul Gandhi | K Facts

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात राजकारणी काही मागे हटायला तयार नाहीत. प्रचार रॅली, सभा, सभेतील माणसं हे काही थांबायचं नाव घेत नाही. त्यात कोरोनारुग्णांचा वाढता आकडा पाहून सामान्यांच्या आणि गरिबांच्या नाकीनऊ आले आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करून समजदारीची भुमीका घेतली आहे.

देशात करोनामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. राहुल गांधी यांनी या ट्वीटमधून सर्व राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. करोनाच्या स्थितीत मोठ्या प्रचारसभा घेण्याचा परिणाम काय होईल, याचा विचार नेत्यांनी करावा, असं राहुल गांधी म्हणाले. प्रचारसभा रद्द करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या एका प्रचारसभेला झालेली गर्दी पाहून त्यांनी नेत्यांना इशारा दिला. एवढी गर्दी आपण प्रथमच बघितली, असं राहुल गांधी म्हणाले. करोना रुग्ण आणि त्याने होणारे मृत्युही आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बघितले, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. सरकार करोनाने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

अशातच संमिश्र भावना जनतेमध्ये उमटताना दिसत आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात “तुम्ही बंगालच्या पिक्चरमध्ये तरी होतात का?” वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना या संकटाची अखेर जाणीव झाली आहे. जनता दलाने (संयुक्त) दिल्ली आणि पाटण्यातील आपली मुख्यालये बंद केली. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे राहिले असून त्यात भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांच्या होणाऱ्या प्रचारसभा कमी करण्याचा विचार पक्षाचे नेतृत्व करीत आहे. मात्र, अजून निर्णय जाहीर झालेला नाही.

या सगळ्यात राहुल गांधींवर मात्र सामान्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मिडीयाच्या आधारे अनेक नेटकरी राहूल गांधीचे विशेष कौतुक करताना आपल्याला पहायला मिळत आहेत. तर काहीजण यामागे राजकीय हेतू असल्याचे सांगत आहेत. असो… पण चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला जातोय एवढं नक्की.


शब्दांकन – शामल भंडारे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...