Home गाजावाजा स्पेशल भूताच्या भीतीपोटी 42 वर्ष बंद होते हे रेल्वेस्थानक
गाजावाजा स्पेशल

भूताच्या भीतीपोटी 42 वर्ष बंद होते हे रेल्वेस्थानक

7
Begunkodar Railway Station
Begunkodar Railway Station

आज सुद्धा मुलांना भूत-प्रेतांच्या कथा ऐकण्यास मजा येते. परंतु भूत-प्रेतांचे अस्तित्व केवळ कथांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. आता पर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही ज्यामध्ये खरंच भूत असतात हे वास्तविकरित्या सिद्ध झाले आहे. पण या बद्दलचे दावे वेळोवेळी जरुर केले जातात. काही लोक असा दावा करतात की ते त्यांना पाहू शकतात. या बद्दलच्या विविध सत्य कथा ही सांगितल्या जातात. पण हे खरंच असं असेल का असा प्रश्न नेहमीच मनात निर्माण होतो. परंतु देशातच नव्हे तर जगात सुद्धा अशी काही हॉन्टेड ठिकाणं आजही आहेत जेथे जाण्यास सक्त मनाई केली जाते. अशातच देशात असे एक ठिकाण आहे जेथे भूतांच्या भीतीपोटी तब्बल ४२ वर्ष बंद ठेवले गेले होते. खरंतर हे एक रेल्वे स्थानक आहे. (Begunkodar Railway Station)

पश्चिम बंगाल मधील पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोडोर रेल्वे स्थानक. १९६० मध्ये सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सर्वकाही ठिक होते. परंतु सहा वर्षानंतर म्हणजेच १९६७ रोजी जेव्हा स्थानक बंद केले. कारण काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकात एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. ही अफवा खुप पसरली गेली.

खरंतर एका महिलेचा मृत्यू रेल्वेने धडक दिल्याने झाला होता. सुरुवातीला लोकांचा या अफवेवर विश्वास बसत नव्हता. पण नंतर स्टेशन मास्तरांनी रात्रीच्या वेळी काळोखात एक सफेद साडीतील महिलेला चालताना पाहिले. हैराण करणारी गोष्ट होती की, काही दिवसानंतर स्टेशन मास्तर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचा मृत्यू रेल्वे क्वार्टर्समध्ये झाला. त्यांचे मृतदेह घरात सापडले.

रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी दावा केला की, स्टेशन मास्तर आणि त्याच्या नातेवाईकांच्या मृत्यूमागे त्या भूताचाच हात होता. या घटनेनंतर लोकांनी संध्याकाळ होताच स्थानकात थांबणे बंद केले होते. या स्थानकाला भुताटकी स्थानक म्हटले जाऊ लागले होते.(Begunkodar Railway Station)

हेही वाचा- १३ वेळा हल्ले केल्यानंतरही मुघल-इंग्रजांना जिंकता आला नाही लोहागढ

या स्थानकाबद्दल खुप चर्चा झाली. असे ही बोलले जाऊ लागले होते की, संध्याकाळ नंतर जेव्हा एखादी ट्रेन स्थानकातून धावल्यानंतर त्या महिलेचे भूत सुद्धा ट्रेनच्या मागे पळत सुटायचे. या व्यतिरिक्त काही लोकांनी भूताला रेल्वच्या रुळांवर नाचताना सुद्धा पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर स्थानक तब्बल ४२ वर्षांसाठी बंद केले होते. या दरम्यान एकही ट्रेन तेथे थांबवली जात नव्हती. पण २००९ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर पुन्हा ते सुरु केले गेले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....