Home गाजावाजा स्पेशल जेव्हा काँग्रेसवर भारी पडल्या होत्या इंदिरा गांधी, पक्षाच्या उमेदवाराच्याच विरोधात उतरवला होता कँन्डिडेट
गाजावाजा स्पेशल

जेव्हा काँग्रेसवर भारी पडल्या होत्या इंदिरा गांधी, पक्षाच्या उमेदवाराच्याच विरोधात उतरवला होता कँन्डिडेट

8
Emergency in India
Emergency in India

देशाच्या राजकरणाने असा ही काळ पाहिला आहे जेव्हा इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी आपल्या पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराच्या विरोधातच आपला राष्ट्रपती कँन्डिडेट दिला होता. न केवळ त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले तर आपल्या आमदार-खासदारांना आपल्या अंतरात्माच्या आवाजावर मत देण्याचे अपील केले होते. हा काळ १९६९ मधील होता. तेव्हा इंदिरा गांधी यांचे सरकार आणि संघटनेवर मजबूत पकड नव्हती. अशातच जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन यांचे अचानक निधन झाले. तेव्हा इंदिरा गांधी यांना असे वाटत होते की, राष्ट्रपती असा असावा की त्यांचा ताळमेळ ठीक असेल. उमेदवार ठरवण्यासाठी संसदीय दलाची बैठक बँगलोर मध्ये बोलावली गेली.

राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी एकमत झाले नाही. मतदान झाले तेव्हा इंदिरा यांच्या सोबत केवळ बाबू जगजीवन राम आणि फखरुद्दीन अली अहमद राहिले. संसदीय बोर्डाच्या पाच सदस्य, पक्षाचे अध्यक्ष निजलिंगप्पा, के कामराज, एकसे पाटील, मोरारजी देसाई आणि यशवंत राव चव्हाण यांनी बहुमताने एन. संजीव रेड्डी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. इंदिरा गांधी यांच्यासाठी ही परिस्थिती अस्वस्थ करणारी होती. त्यांचा तर्क होता की, वीवी गिरी यांच्या नावावर विरोधी दलांसोबत एकमत झाले आहे, त्यासाठी काँग्रेसने वीवी गिरी यांना उमेदवार म्हणून घोषित करावे.

इंदिरा यांनी वीवी गिरी यांना अर्ज भरण्यासाठी तयार केले आणि बाबू जगजीवन राम यांच्यासोबत स्वत: त्यांचे प्रस्तावक बनून हा मेसेज स्पष्ट केला की, त्यांना वीवी गिरींच्या बाजूनेच मतदान हवे आहे. संघटना इंदिरा गांधी यांच्या विरोधी छावणीच्या हातात होते. याचे असे झाले की, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सारख्या तमाम राज्यांनी संजीव रेड्डी यांना समर्थन दिले. इंदिरांसाठी हा कठीण काळ होता. कारण जेव्हा वीवी गिरी यांचा पराभव झाल्यास तर इंदिरा गांधी यांना राजीनामा द्यावा लागला असता. वीवी गिरी यांची स्थिती उत्तर प्रदेशातूनच मजबूत होऊ शकत होती. इंदिरा यांनी स्वत: कमान सांभाळली.

हेमवती नंदन बहुगुणा सारख्या लोकांनी त्यांनी वीवी गिरी यांच्या बाजूने स्थिती निर्माण करण्यास सांगितले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि पक्ष एकमेकांच्या समोर आल्याने पक्ष तुटत असल्याचे दिसून येत होते. कमलापति त्रिपाठी तेव्हा युपी काँग्रेसचे अध्यक्ष होते. तमात लोकांनी दखल दिल्यानंतर ही कमलापति तयार झाले आणि त्यांनी मतदानपू्र्वी रोज आधी निजलिंगप्पा यांना पत्र पाठवून काँग्रेसला स्वतंत्र रुपात मतदानाच्या अधिकाराबद्दल बोलले.

हे देखील वाचा- शी जिनपिंगच्या कार्यकाळात किती बदलला चीन, वाचा सविस्तर

अंर्तमनाच्या आवाजावरुन दिलेल्या मतदानाने वीवी गिरी यांना यशाचा किरण दाखवला. युपी मधून त्यांना १८१ मत मिळाली होती.तर रेड्डी यांना १३९ मत. या राष्ट्रपती निवडणूकीत दोन तथ्यांवर आखणी लक्ष दिले पाहिजे. एक, वीवी गिरी विरोधकांची सुद्धा पसंद होते. दुसरे म्हणजे बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयामुळे सोशलिस्ट आणि साम्यवाद्यांना इंदिरांना गांधी यांच्या बाजूने उभे केले होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....