Home गाजावाजा स्पेशल महाराष्ट्रात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोला’
गाजावाजा स्पेशल

महाराष्ट्रात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोला’

9
Hello History
Hello History

महाराष्ट्र सरकारने आता अपील केले आहे की, जेव्हा तुम्हाला एखाद्याचा फोन येईल तेव्हा ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोला. सरकार मधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असे म्हटले की, वंदे मातरम् चा अर्थ का की, आम्ही आपल्या आईला नमन करत आहोत. त्यामुळेच लोकांना असे अपील करण्यात आले आहे की, त्यांनी हॅलो ऐवी वंदे मातरम् असे बोलावे. आता प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर सरकारचे हे अपील किती जण पाळतील? मात्र तुम्ही कधी विचार केलाय का आपण जेव्हा एखाद्याचा फोन उचलतो तेव्हा हॅलो हाच शब्द का बोलतो? (Hello History)

फोनवर हॅलो बोलण्याची कथा आजचीच नव्हे तर त्या काळातील आहे जेव्हा अलेक्जेंडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता. असे म्हटले जाते की, त्यांच्याच कारणास्तव हॅलो बोलण्याची सुरुवात झाली आणि ती आजही सुरुच आहे. फोनवर हॅलो बोलण्यासंदर्भातील काही कथा आहेत. ज्याबद्दल वेगवेगळे सांगितले जाते.

ग्राहम बेल यांची गर्लफ्रेंडचे नाव मारग्रट हॅलो असे होते. त्यामुळेच त्यांनी फोनवर बोलण्यापूर्वी ‘हॅलो’ असे बोलण्यास सुरु केले होते. मात्र हॅलो नावाची महिला असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळेच लोक या कथेला विरोध करतात.

Hello History
Hello History

परंतु अमेरिकन टेलीग्राफ अॅन्ड टेलिफोन कंपनीच्या कागदपत्रांवरुन कळते की, ग्राहम बेल यांनी हॅलो या शब्दाचा कधीच वापर केला नव्हता. त्यांनी सर्वात प्रथम आपल्या असिस्टेंट सोबत बातचीत केली होती. त्यावेळी फोनवर त्यांनी असे म्हटले होते की, Come here. I want to see you. तर काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जाते की, पूर्वी अहो (Ahoy) चा वापर केला जायचा. त्यानंतर Ahoy हे हॅलो मध्ये बदलले गेले. याचसोबत असे ही सांगितले जाते की, याची सुरुवात थॉमस एडिसन यांनी केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांनी प्रथम फोन केला तेव्हा हॅलो शब्दाचाच वापर केला होता आणि त्यानंतर तो बोलण्यात आला. (Hello History)

हे देखील वाचा- विमानात फोन फ्लाइट मोडवर का ठेवला जातो? जाणून घ्या कारणं

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारने वंदे मातरम् शब्द उच्चारण्याचे निर्देशन दिल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात टिका नागरिकांकडून केली जात आहे. विरोधकांकडून ही याबद्दल विविध प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. अशातच मुंबईत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी असे म्हटले की, मी सारे जहां से अच्छा असे नक्कीच बोलेन पण वंदे मातरम् असे कधीच बोलणार नाही. आम्ही फक्त अल्लाहाची उपासना करतो आणि त्याचीच उपासना करु.

दुसऱ्या बाजूला एनसीपीच्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला ही विरोध केला आहे. त्यांनी असे म्हटले की, लोकांना त्यांच्या स्वेच्छेने बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकार हुकूमशाही वृत्ती स्विकारु शकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या फोनला उत्तर देताना वंदे मातरम् बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....