Home गाजावाजा स्पेशल एक काळ असा होता जेव्हा रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते साइरस मिस्री
गाजावाजा स्पेशल

एक काळ असा होता जेव्हा रतन टाटा यांचे निकटवर्तीय होते साइरस मिस्री

13
Cyrus mistry and ratan tata
Cyrus mistry and ratan tata

उद्योग जगतासह देशासाठी अत्यंत दु:खद घटना सध्या घडली आहे. कारण टाटा सन्सचे माजी चेअरमन साइरस मिस्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. मात्र एक काळ असा होता की, साइरस मिस्री हे रतन टाटा (Cyrus Mistry- Ratan Tata) यांचे निकटवर्तीय होते. सर्वात प्रथम सायरस मिस्री यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांची आई पेट पेरिन डबास या आयरलँन्ड येथे राहणाऱ्या होत्या. १९९३ मध्ये आयरलँन्डच्या डबलिनमध्ये त्यांचा जन्म झाला. पेट पेरिन डबास यांच्या लग्नानंतर पलोनजी मिस्री सुद्धा आयरिश नागरिक झाले होते. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली झाल्या.

पलोनजी शापूरजी यांच्या दोन्ही मुलांचे नाव शापूर मिस्री आणि साइरस मिस्री असे ठेवण्यात आले. तर मुली लैला आणि अल्लू. पलोनजी यांची मुलगी अल्लू हिचा विवाह नोएल टाटा यांच्यासोबत झाला. अशाप्रकारे टाटा आणि मिस्री परिवाराचे नातेसंबंध जोडले गेले. तर नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.

Cyrus Mistry & Ratan Tata relationship
Cyrus Mistry & Ratan Tata relationship

म्हणजेच बहिण अल्लू हिचा नवरा नोएल टाटा हे नात्याने साइरस मिस्री यांचे भावोजी झाले. अशाप्रकारे नोएल यांचे सावत्र भाऊ रतन टाटा सुद्धा त्यांचे भावोजी झाले. म्हणजेच साइरस मित्री हे रतन टाटा यांच्यासोबतचे संबंध अगदी परिवारातील खास व्यक्तीप्रमाणे होते. तर वडिलांप्रमाणेच साइरस मिस्री यांच्याजवळ सुद्धा आयरलँन्डची नागरिकता होती. मात्र त्यांनी लग्न हे भारतात केले. देशाच्या प्रमुख वकिलांपैकी एक असलेले इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. साइरस यांना दोन मुलं आहेत.(Cyrus Mistry- Ratan Tata)

हे देखील वाचा- या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा झाला होता अपघाती मृत्यू 

खरंतर साइर पालोनजी मिस्री यांना २८ सप्टेंबर, २०१२ मध्ये टाटाचे चेअरमन पद दिले गेले. मिस्री यांनी सहाव्या चेअरमन पदी ग्रुपचा कारभार सांभाळला होता. तर मिस्री यांना पदावरुन हटवल्यानंतर टाटा ग्रुपने असे म्हटले होते की, बोर्डने आपल्या एकमताने आणि टाटा ट्रस्टच्या शेअरहोल्डर्सच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला आहे. टाटा सन्स आणि टाटा ग्रुपच्या उत्तम भवितव्यासाठी हा बदल करणे गरजेचे होते. जेव्हा मिस्री यांना हटववण्यात आले तेव्हा टाटा सन्सचे १८.५ टक्के शेअर्स हे याच परिवाराकडे होते. त्यामुळेच ते मोठे शेअरहोल्डर्स होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....