Home गाजावाजा स्पेशल एफिल टॉवर पेक्षा ही उंच आहे जम्मू-कश्मीर मधील ‘Chenab Bridge’
गाजावाजा स्पेशल

एफिल टॉवर पेक्षा ही उंच आहे जम्मू-कश्मीर मधील ‘Chenab Bridge’

8
chenab bridge
chenab bridge

दीर्घकाळापासून वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अत्यंत मेहनतीने उभारण्यात आलेल्या जम्मू-कश्मीर मध्ये जगातील सर्वाधिक मोठा रेल्वे पूलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. नुकतेच पुलाचा अखेरचा जोड लावण्यात आला. यावेळी कामगारांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाच पण अजादी का अमृतमोहत्सव ही साजरा केला. तर अर्ध चंद्रासारखा दिसणारा चिनाब ब्रिज हा जगातील सर्विध आर्च ब्रीज आहे. तो चिनाब नदीवर उभारला जात आहे. पुलाची उंची ही नदीच्या सपाटीपासून ३५९ मीटर उंच आहे. म्हणजेच कुतुबमीनार पेक्षा ही जवळजवळ पाचपट अधिक उंचीवर ट्रेन धावणार आहे. ऐवढेच नव्हे तर या पुलाची लांबी ही पॅरिस मधल एफिल टॉवरपेक्षा ही ३५ मीटर अधिक आहे.(Chenab Bridge)

चिनाब पुलाची उभारणी मुंबईतील दिग्गज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी AFCONS द्वारे केले जात आहे. नुकताच याचा ओवरआर्च डॅक लावण्याचे काम पूर्ण झाले. आता अशी अपेक्षा केली जात आहे की, हा पुल डिसेंबर पर्यंत रेल्वे या मार्गावरुन धावू शकते. ब्रिजची उभारणी कोंकण रेल्वे उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी जवळजवळ २८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १११ किमी लांब कटरा आणि बनिहार मार्गावर रेल्वे ब्रिज झाल्यास कश्मीर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून देश जोडला जाणार आहे.

Chenab Bridge
Chenab Bridge

काय आहे खासियत?
जगातील सर्वाधिक उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यान तयार करण्यात आला आहे. या पुलाची लांबी १.३१५ किमी असून त्याच्या आर्चचे एकूण वजन १०,६१९ मीट्रिक टन आहे. पुल्स १७ केबल्सवर उभारला आहे. याची खासियत अशी की, ना त्याला भुकंपाचे धक्के जाणवतील किंवा जोरदार हल्ल्यांचा सुद्धा त्यावर परिणाम होणार नाही आहे. ब्रिजवर जवळजवळ १०० किमीच्या वेगाने ट्रेन धावणार आहे. ती २६० किमीच्या वेगाने वाऱ्यांमध्ये सुद्धा अत्यंत सुरक्षितरित्या धावू शकते.

जगातील सर्वाधिक आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येणाऱ्या या ब्रिजवर जरी एखाद्या मिसाइलच्या माध्यमातून हल्ला केला तरीही त्याला काहीही होणार नाही. याच्या आर्चमध्ये स्टिलमध्ये जे बॉक्स आहेत आणि त्या पुलाला स्थिरता देण्यासाठी त्यामध्ये कॉक्रिट भरण्यात आले आहे.(Chenab Bridge)

हे देखील वाचा- ५५० वर्षांपूर्वीचा ममी, बसल्या जागीच भिक्षुने त्यागले होते प्राण

२००४ पासून सुरुय याचे काम
पुलाच्या उभारणीचे काम २००४ पासून सुरु झाले आहे. परंतु हा पूल २००९ पर्यंत बांधून पुर्ण होईल असा अंदाज लावला जात होता. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव काहीवेळेस प्रोजेक्टच्या साइटवर काम थांबवण्यात आले होते. पण आता लवकरच या मार्गावरुन रेल्वे धावणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....